
ठरलं तर मग
‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायली यांच्यातील दुरावा पाहायला मिळत आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत आल्यामुळे आता सायली अर्जुनच्या घरातून बाहेर पडणार आहे. दुसरीकडे, अर्जुन आणि सायली यांना मधुभाऊंच्या केसमध्ये अतिशय महत्त्वाचा पुरावा सापडणार आहे. तुरुंगात असलेल्या महिपतकडे मोबाईल असून, तो मधुभाऊंच्या केसविषयी काहीतरी बोलत होता, अशी माहिती चैतन्य अर्जुन आणि सायलीला देणार आहे त्यामुळे आता या मालिकेला वेगळा ट्विस्ट येताना दिसणार आहे. या मालिकेने ६.९चा टीआरपी मिळवत पहिला नंबर पटकावला आहे.







