
No Detention Policy Abolished : शिक्षण क्षेत्रात चर्चेचा व वादाचा विषय ठरलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नो डिटेंशन पॉलिसी (no detention policy) बंद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता पाचवीते आठवीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा महत्त्वाची राहणार आहे. जर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले तचर त्यांना वरच्या वर्गात ढकलले जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे.