पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: तुलसीदासजींचे मानवतेसाठी‎मोठे योगदान, मनावर राज्य‎

0
53
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  तुलसीदासजींचे मानवतेसाठी‎मोठे योगदान, मनावर राज्य‎


  • Marathi News
  • Opinion
  • Column By Pt. Vijayshankar Mehta, Tulsidasji’s Great Contribution To Humanity, Ruling The Mind

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या काळात मानवी मन दु:खी-कष्टी आहे. सतत अशा घटना‎कानावर येत आहेत की त्या ऐकून आणि वाचून मनात भीतीही निर्माण‎होते आणि चिंतादेखील वाढते. टीव्ही आणि मोबाइल आले आणि‎त्यांनी आपले प्रभाव दाखवून दिले. त्यांच्यामुळेही मानवी मन त्रस्त‎झाले. पण त्या वेळी आपल्याकडे समज नव्हती की आपण‎सावधगिरी बाळगावी. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या या युगात‎आपण थोडे जागरूक व्हायला हवे.

आज माणसांनी वाचणे आणि‎लिहिणे जवळपास थांबवले आहे. आज तुलसीदासजींची जयंती‎आहे. यानिमित्ताने आपली मुले दोन ग्रंथ रामचरितमानस आणि‎भगवद्गीता वाचतील एवढा तरी प्रयत्न आपण करावा.‎तुलसीदासजींनी रामचरितमानस लिहून मानवी मनासाठी एक अत्यंत‎सुंदर कार्य केले आहे. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये आदर्शाला वास्तवावर‎विजय मिळवून दिला. रामचरितमानसची सर्वात मोठी भाषा-शक्ती ही‎आहे की त्यात लोकोक्ती आणि म्हणी अत्यंत सोप्या पद्धतीने सादर‎केल्या आहेत. काही दोहे आणि चौपाया तर भारतीय मनात इतक्या‎खोलवर बसल्या आहेत .



Source link