
Startup Success Story : राजस्थानचे कबीर आणि चेतन सिहाग यांनी 2020 मध्ये वेदिका ऑर्गेनिक्सची सुरुवात केली. बाजारात खराब आणि कमी दर्ज्याच्या आणि मसाल्यांची त्यांना चिंता होती. त्यामुळे यासगळ्यात त्यांनी एक दुसरा ऑप्शन निवडण्याचा विचार केला आणि आज त्यांच्या स्टार्टअपची कमाई ही कोटींच्या घरात आहे.
आजकाल जेव्हा आपण जेव्हा कोणत्याही गोष्टींची खरेदी करतो, तेव्हा खूप विचार करतो. पण त्या तेलाचा आणि मसाल्यांचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो का? कबीर आणि चेतन सिहाग यांना देखील हा प्रश्न पडला होता. सततचे येणारे प्रश्न आणि सगळ्या भेसळयुक्य वस्तू याला ते दोघं कंटाळले होते. कबीरनं पाहिलं की जेव्हा ते पुढील शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेले तेव्हा जेवणाच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडला होता. त्यानंतर त्यांनी वेदिका ऑर्गेनिक्स नावानं 2020 मध्ये एक कंपनी सुरु केली. ही कंपनी लाकडाच्या घाणीत बनवलेलं तेल आणि पोषक तत्व युक्त मसाले विकू लागले. पण आता ही कंपनी सुरु केल्यानंतर हे यशस्वी कसे झाले त्यांनी असं वेगळं काय केलं? नेमकी त्यांची स्टोरी काय आहे ते जाणून घेऊया…
चेतन यांच्यासाठी जेवणाची क्वालिटी आणि स्वच्छता हे खूप महत्त्वाचं होतं. एका महिन्यात ते एकदा किंवा दोनवेळा 100 किलोमीटर दूर जाऊन शुद्ध तेल आणायचे. 2017 मध्ये त्यांना वाटलं की जर चांगलं जेवणं पाहिजे म्हणून आपण इतकी मेहनत करतोय. तर आपल्यासारखे असे अनेक लोकं असतील जे अशा समस्येचा सामना करत असतील. राजस्थानच्या या उद्योजकांनी त्यांच्या काही नातेवाईकांना कॅन्सर आणि डायबिटीज सारख्या समस्येनं त्रस्त झाले आणि अनेकांचे त्यामुळे निधन झाले. 2019 मध्ये कबीर अमेरिकेवरून भारतात परतले. अमेरिकेत तर त्यांना मास्टर डिग्रीसाठी स्कॉलरशिप मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाची साथ दिली.
अमेरिकेत शिक्षण करत असताना कबीर यांनी पाहिलं की ऑर्गेनिक अन्न पदार्थ तिथे सहज मिळतात. पण भारतात ते शोधावे लागतात. त्यातही जे मिळतं ते किती शुद्ध आहे हे माहित करणं खूप कठीण आहे. जेवणाच्या वस्तूंमध्ये भेसळ शोधण्याच्या कमीतरता त्यांना जाणवली. त्यामुळेच त्या दोन्ही भावांनी मिळून एक कंपनी सुरु करण्याचं निर्णय घेतलं आणि तेल काढण्यासाठी 200° C तापमानाचा वापर केला. जास्त तापमान ते तेलाचे प्राकृतिक पोषक तत्व नष्ट करण्यात येतात. वेदिका ऑर्गेनिक्सच्या 100 ग्रॅम सरसो तेलात जवळपास 17.3 ग्रॅम ओमेगा-3 असतात. तर हे इतर दुसऱ्या ब्रॅन्डसच्या तुलनेत दुप्पट आहे.
हेही वाचा : गावातल्या ‘या’ नव्या सरकारी डॉक्टरची ‘पंचायत’ मधल्या सचिव जीसारखी अवस्था
कबीर आणि चेतन यांनी हे स्टार्टअप 3,000 शेतकऱ्यांकडून बियाणं आणि सामान खरेदी केला. हे शेतकरी 25 पेक्षा जास्त गावात राहतात. कंपनी शेतकऱ्यांना योग्य दर देत होती. ही कंपनी शेतकऱ्यांना चांगला दर देते. त्याशिवाय ते हे देखील सुनिश्चित करतात की कच्चा माल हा ऑर्गेनिक पद्धतीनं वाढवायला हवा. बियाणं काढल्यानंतर त्या बियांची चांगल्या प्रकारे तापसनी केली जाते. कंपनी हळू-हळू वाढताना दिसते. तर दर महिन्याला ते जवळपास 18 लाख रुपये कमवतात.