‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

0
1
‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहे. वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले होते. या मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले. यांच्यासारख्यामुळे आमची जात बदनाम होतेय,  त्याला वाल्मीक काय म्हणता तो २० खून करणारा वाल्या असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय.



Source link