
पुण्यातील खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकअमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घरा-घरांत पोहचवले, त्यांना पराभूत करणे सोपे नाही, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला.




