
Maharashtra News: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अनेक बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षातील अनेक नेत्यांना पक्षाच्या नेतृत्वावर हल्ला चढवला. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवर आणि रविंद्र चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. ज्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकला. आता नाराजांची समजूत काढण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.








