
यातील एका मुलाला वेदना असह्य झाल्यानं, त्याने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर त्याच्या पालकाने थेट आळंदी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाकाळ केली. मात्र नंतर वरिष्ठांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अन्य दोन मुलांनीही महाराजांवर आरोप केले. अशाप्रकारे दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. आत्तापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.






