केवळ रामलल्ला नव्हे तर देशातील ४ कोटी गरीबांना पक्के घर मिळाले, मोदींचा विरोधकांवर हल्ला

0
16
केवळ रामलल्ला नव्हे तर देशातील ४ कोटी गरीबांना पक्के घर मिळाले, मोदींचा विरोधकांवर हल्ला


पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी शनिवारी रामनगरी अयोध्येत १५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण केले. सरकारकडून केवळ हिंदू तीर्थक्षेत्रांचाच विकास केला जात असलेल्या विरोधकांच्या आरोपाला मोदींनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, एक काळ होता, जेव्हा रामलल्ला झोपडीत विराजमान होते. आज पक्के घर केवळ रामालाच नव्हे तरदेशातील चार कोटी गरीब कुटूंबाना मिळाले आहे. भारत आज आपल्या तीर्थस्थळांचा विकास करत आहे त्याचबरोबर डिजिटल टेक्नालॉजीमध्येही पुढे जात आहे. देशात ३० हजाराहून अधिक पंचायत भवन निर्माण केले जात आहेत.



Source link