
महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. मात्र राज्यातील १५ जागांवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. महायुतीने (भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना) ४ जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. दुसरीकडे विरोधी आघाडी महाविकास आघाडीची (काँग्रेस, उद्धव आणि शरद पवार यांचा पक्ष) अवस्था आणखी बिकट आहे. या पक्षांनी ११ जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उर्वरित जागा छोट्या मित्रपक्षांना दिल्या जातील, असे या पक्षांकडून सांगण्यात आले होते, पण त्याबाबतही कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आता प्रश्न असा आहे की, उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेनंतर १५ जागांवर उमेदवार जाहीर न करण्याचा या पक्षांचा हेतू काय असू शकतो?