
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कुटुंब वाढवण्याच्या केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांचा मी आदर करते, पण मुलांच्या संगोपनाचा त्यांना काय अनुभव आहे? अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत, मुलं मोठी झाल्यावर त्यांना रोजगार मिळत नाही. लोकांना अधिक मुलांची गरज कशासाठी आहे? “आम्ही ससे आहोत का जे प्रजनन करत राहतील? कोणताही पुरुष आपल्या मुलीचे लग्न बेरोजगार पुरुषाशी करायला तयार नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. ते सगळ्यांची काळजी कशी घेतील? त्यांच्याकडे पैसे नाहीत.