अत्यंत सुंदर! हरिवंश राय यांची कविता आणि अमिताभची स्वप्नातील राणी बेतिया; आता उघडणार तिचा खजिना

0
1
अत्यंत सुंदर! हरिवंश राय यांची कविता आणि अमिताभची स्वप्नातील राणी बेतिया; आता उघडणार तिचा खजिना


बिहारच्या तीन प्रमुख राजघराण्यांपैकी एक असलेल्या बेतिया राजची राणी जानकी कुंवर आज पुन्हा तिच्या मृत्यूच्या 71 वर्षांनंतर चर्चेत आली आहे. 1954 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे असलेल्या कोठीत राणी जानकी कुंवर यांचं निधन झालं. राणीच्या मृत्यूनंतर कोर्ट ऑफ वॉर्ड्सने केवळ त्यांची हवेली आणि जमिनीचा ताबा घेतला नाही तर  तिजोरीही काढून घेतली. ती तिजोरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्रिवेणी शाखेत ठेवण्यात आली होती. आता बिहार महसूल परिषदेचे पथक प्रयागराजला पोहोचले असून बेतिया राणीच्या मालमत्तेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तिजोरीत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचा म्हटलं जातं आहे. 

राणीचा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेत उल्लेख 

ही तिचं बेटिया राणीची आहे जिचा उल्लेख अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या अधूरे ख्वाब आणि बसेरे से दूर या चित्रपटात केला आहे. तर ही बेतिया राणी कोण होती तर 1883 मध्ये बिहारमधील सर्वात मोठ्या राजघराण्यातील बेतिया राजाचे महाराजा राजेंद्र किशोर सिंह यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा हरेंद्र किशोर सिंहासनावर विराजमान झाला. महाराज हरेंद्र किशोर हे एक कुशल नेते आणि प्रशासक होते. ब्रिटिश सरकारनेही त्याची ताकद मान्य केली होती. 

1884 मध्ये त्यांना महाराजा बहादूर ही पदवी देण्याचे हेच कारण होते. इतकंच नाही तर त्या काळात त्यांना बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर सर ऑगस्टस रिव्हर्स थॉम्पसन यांच्याकडून खिलाफत आणि सनद देखील देण्यात आली. त्यानंतर 1 मार्च 1889 रोजी त्यांना भारतीय साम्राज्याच्या सर्वात प्रतिष्ठित ऑर्डरचा नाईट कमांडर बनवण्यात आलं. एवढी प्रसिद्धी आणि कामगिरी असूनही, महाराजा हरेंद्र सिंह यांची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. वडील जिवंत असताना त्यांनी शिव रत्न कुंवर हिच्याशी लग्न केलं पण ते वडील होऊ शकले नाहीत म्हणून काही दिवसांनी त्यांनी जानकी कुंवर हिच्याशी लग्न केले. यानंतरही त्यांना मुलं झालं नाही आणि अखेर 26 मार्च 1893३ रोजी बेतिया राजाचा कोणताही वारस न सोडता त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्युनंतर, महाराणी शिवरत्न कुंवर यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली, मात्र त्यांचेही 24 मार्च 1896 रोजी निधन झालं. अशा परिस्थितीत, त्यांची दुसरी राणी जानकी कुंवर संपूर्ण शाही मालमत्तेची वारस बनली. राणी जानकी कुंवर खूप सुंदर होती. राणीचे ओठ आणि गाल अतिशय सुंदर, तिचे डोळ्यांवरुन नजर हटत नव्हती. असं म्हटलं जातं की जेव्हा महाराजा हरेंद्र सिंह यांनी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांचं भान हरपलं होतं. हरिवंशराय बच्चन देखील बेतिया राणीच्या सौंदर्यावर अनेक कविता केल्या आहेत. 

हे सर्व असूनही, त्यांच्याकडे राज्य कारभार हाताळण्याची क्षमता नव्हती. म्हणून ब्रिटिश राजवटीने त्याच्या राज्य मालमत्तेचा ताबा घेतला. यानंतर, महाराणी जानकी कुंवर बेतियाहून तत्कालीन अलाहाबाद, म्हणजेच आजच्या प्रयागराज इथे आल्या आणि येथे त्यांनी एक भव्य हवेली बांधली आणि तिथे राहू लागल्या. 27 नोव्हेंबर 1954 रोजी त्यांचे निधन झालं. त्यानंतर ही हवेली आणि त्यांची मालमत्ता कोर्ट ऑफ वॉर्ड्सने ताब्यात घेतली. सुमारे 22 बिघा जमिनीवर बांधलेला त्यांचा वाडा अजूनही येथे आहे, ज्याबद्दल हरिवंश राय बच्चन यांनी कवितेत उल्लेख केला आहे. ही हवेली सध्या सरकारच्या ताब्यात आहे.





Source link