
२०१९ साली विविध संवर्गासाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला होता. या परीक्षेसाठी उमेदवारांनी मे. न्यासा कंपनी मार्फत अर्ज केले होते. मात्र, भरतीप्रक्रिया रद्द झाल्याने परीक्षा फी बाबत उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. या भरतीसाठी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र गेल्या ४ वर्षांत विविध कारणांमुळे रद्द झालेल्या भरती प्रक्रियेची फी या उमेदवारांना परत मिळणार कधी, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.






