
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशचे उदाहरण देताना इशारा दिला की, बटेंगे तो कटेंगे,एकजुटीने राहिलो तरचसुरक्षित राहू. देशाहून महत्वाचे काहीच नाही. राष्ट्र तेव्हाच मजबूत होते जेव्हा आपण सर्व एकजुटीने राहू व प्रामाणिक राहू. तुम्ही बांगलादेशकडे पाहात असाल, तशी चूक येथे होऊ नये. आपल्याला विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी कार्य करायचे आहे.