
Maharashtra Job: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात नवीन ऊर्जा, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन पॉवर आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमध्ये ३,०५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीदरम्यान ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्स ग्रुपच्या वतीने अनंत अंबानी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. यामुळे राज्यातील तीन लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.