
देशांत आजपासून येत्या १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. याशिवाय, महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.







