
लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असतानाही ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. आता केरळमध्ये सीपीएमने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड मतदारसंघावर दावा केला आहे.
हैदराबाद : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असतानाही ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. आता केरळमध्ये सीपीएमने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
वास्तवात, केरळमधील मित्रपक्ष आणि काँग्रेसदरम्यान जागावाटप करारावर बोलणी निश्चित झाली आहेत. केरळमधील सत्ताधारी एलडीएफने लोकसभेच्या चार जागांपैकी वायनाडची निवड केली आहे जिथे पक्ष लढू शकतो. वायनाड मतदारसंघातून सध्या राहुल गांधी खासदार आहेत. हैदराबादच्या बैठकीत विभाजनाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.










