
बीड जिल्ह्यातील भगवानबाबा गडावर २०२४ मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे व्यासपीठावर प्रमुख नेत्यांची ओळख करून देण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्यासमोरील गर्दीतून जोरदार घोषणा करण्यात आल्या. सर्वांनी वाल्मिक कराड बाबत विचारले. ‘ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही, ते वाल्मिक कराड कुठे आहेत?’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांच्या घोषणांना प्रत्युत्तर दिले. त्यावेळी कराड प्रेक्षकांमध्ये बसले होते