
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या रिलेशनशिपविषयी नेहमीच फार चर्चा होत असतात. सलमान आणि ऐश्वर्या हे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र आले होते. त्यानंतर दोघं प्रेमात पडल्याचे बोलले जाते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण ऐश्वर्या आणि विवेकचा ब्रेकअप का झाला? या मागचे कारण सर्वांना माहिती नव्हते. आता स्वत: विवेकने यावर प्रतिक्रिया दिली आहे.








