
काश्मिरी लोकांची बदनामी करण्यासाठी काश्मीर फाईल्स बनवण्यात आल्याचे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता?, असा सवालही त्यांनी त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हा चित्रपट नरसंहार आणि दहशतवादावर असल्याचे तुम्ही म्हणालात. पक्षाकडून निधी मिळाल्याचे तुम्ही कशाच्या आधारे म्हणू शकता?,’ असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले. यानंतर संतापलेल्या विवेक अग्निहोत्रींनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. माझा चित्रपट दिल्ली फाईल्स असणार आहे, बंगाल फाईल्स नाही. त्यामुळे मी तुमच्यावर मानहानीचा दावा का दाखल करू शकत नाही? असे त्यांनी म्हटले आहे.








