
मात्र, हिंदुस्तान टाइम्सच्या मीडिया रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या अफवांमध्ये तथ्य नसल्याची पुष्टी या महिन्याच्या सुरुवातीला एका सूत्राने केली होती. रिपोर्टनुसार, यासूत्राने म्हटले होते की, ‘जेव्हा लोक बघतात की, ते दोघे एकमेकांसोबत पोस्ट शेअर करत नाहीत, तेव्हा ते समजतात की दोघे वेगेळे झाले आहेत. आपण असं काही नसतं. मलायका तिची बहीण अमृतासोबत सुट्टीवर गेली होती आणि लोकांना वाटले की, दोघे वेगळे झाले आहेत. हा किती मूर्खपणा आहे? उलट त्यांचे नाते अधिक मजबूत होत आहेत. आता लग्न करणं किंवा न करणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते इतके दिवस एकत्र आहेत, आता त्यांच्यात लग्नावरून वाद का होतील? ते एकमेकांशी वचनबद्ध आहेत आणि त्यांच्या नात्यात कोणतीही अडचण नाही.’








