
Tharala Tar Mag Tv Serial : छोट्या पडद्यावरच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या शोमध्ये सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेम बहरत असून, दोघेही त्यांच्या प्रेमाची कबुली कधी देणार, हा प्रश्न अनेक महिने प्रेक्षकांच्या मनात होता. आता अखेर हा क्षण जवळ आला असून, शोच्या प्रोमोने साऱ्यांच्या उत्सुकतेला अजूनच वाव दिला आहे.