
वडिलांविषयी बोलताना रितेश म्हणाला की, ‘सध्याचे राजकारण फार वेगळे आहे. साहेबांच्या काळात राजकारण होते पण कधीही वैयक्तिक टीका केली जात नव्हती. वडिलांची उणीव आम्हाला नेहमीच भासते. पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांसमोर मी माझ्या मनातल्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचे नाते कसे असावे याचे आम्ही ज्वलंत उदाहरण आहोत.’ जेव्हा रितेश भाषण देत होता तेव्हा बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. तसेच आई वैशाली आणि भाऊ अमित देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.