
Business Tips: भारतात गेल्या अनेक दिवसांपासून वर्क लाईफ बॅलन्स बाबत बरीच चर्चा होत आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर, आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे, असे अनेक मोठे उद्योगपतींचे म्हणणे आहे. मात्र, कामाचा अतिरिक्त ताण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. यामुळे नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने कामासह आपल्या वैयक्तिक आयु्ष्यही जगले पाहिजे. अशातच २४ वर्षीय उद्योजकाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे, जो आठवड्यातून फक्त ३० तास काम करतो आणि त्याचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींपेक्षा जास्त आहे.




