
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या काळी आमदारांनी दगाबाजी केली आहे, राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काही आमदार आमच्या विरोधात गेले होते. मात्र यावेळी कोणालाही सोडले जाणार नाही. गद्दारांना आम्ही शोधून काढलं आहे. कोणी आम्हाला मतं दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, या लोकांची आमच्याकडे यादी आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीला अहवाल पाठवला आहे.