
त्याचबरोबर मराठा-ओबीसी वाद होऊ नये, असे मला वाटते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे. आता सगळ्यांनी एकत्र बसणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले त्यात अनुसुचित जाती-जमाती, मराठ्यांचाही त्यात समावेश होता.सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ते घटनेत कसे बसवायचं ते पाहावे लागेल.