
ममता कुलकर्णी विषयी
१९९३मध्ये, ममता सैफ अली खानसोबत “आशिक आवारा” चित्रपटात दिसली, ज्यासाठी तिला न्यू फेस अवॉर्ड मिळाला. आपल्या १० वर्षाचा कारकिर्दीत ममताने मोजकेच चित्रपट केले असले तरी, या दरम्यान ती तिच्या चित्रपटांपेक्षा इतर काँट्रोव्हर्सींसाठीच जास्त चर्चेत राहिली. तिने ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘सबसे बड़ा खिलाडी’, ‘आंदोलन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पण १९९७ मध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तिला अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर ममता दुबईमध्ये स्थायिक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात २०१६ मध्ये दाखल केलेला २००० कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला रद्द केला. कारण तिच्याविरोधात गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांमधून गुन्हा सिद्ध झाला नव्हता.







