
राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी असताना अजित पवार यांनी या संदर्भात २७ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. तसंच, नामांतराच्या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली होती. ही मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं व ग्रामपंचायतींचं अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.