वीर धरणामधून नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडणार

0
3
वीर धरणामधून नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडणार

फलटण  – नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दिनांक २४/७/२०२४ रोजी वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून धरण ७५.८०% भरले आहे.
वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या ४८ तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल, तरी नीरा नदी काठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन आपले स्तरावर करण्यात यावे.