
वसईतील एका कंपनात एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. कंपनीत कामाला असणाऱ्या अज्ञाताने महिलांच्या पिण्याच्या बाटलीत लघवी केली होती. कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेने पाणी समजून ते चुकून प्यायल्यामुळे हा प्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्या तीन मुलींना मालकाकडे तक्रार केली. मात्र त्याने उलट मुलींवरच संशय घेतल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. मुलींनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चौकशी करत आहेत.