
Vande Bharat Makes History: जम्मू-काश्मीरच्या जनतेची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत ट्रेनची चाचणी आज पूर्ण झाली. या दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून गेली. हा चिनाब रेल्वे पूल आहे. याशिवाय, भारतातील पहिला केबल रेल्वे पूल असलेल्या अंजी खड पुलावरूनही ही गाडी गेली. या वंदे भारत ट्रेनची खास रचना काश्मीर खोऱ्यातील थंड हवामानासाठी करण्यात आली आहे.