
वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे. एका ही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे, खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव.. उकाडा) प्रयोग पहात होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण शो मस्ट गो ऑनवाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हाला ही त्रास होतोच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाहीये. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे, पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावर वर????????’







