
UPSC: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षांना लेटरल एन्ट्री जाहिरात रद्द करण्याबाबत पत्र लिहिले आहे. यूपीएससीने गेल्या शनिवारी संयुक्त सचिवांची १० आणि संचालक/उपसचिवांची ३५ अशी एकूण ४५ पदे कंत्राटी पद्धतीने लेटरल एन्ट्री पद्धतीने भरण्यात येणार असल्याची जाहिरात दिली होती. या योजनेचा उद्देश सरकारी विभागांमध्ये तज्ञ (खाजगी क्षेत्रासह) नियुक्त करणे हा आहे.







