
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला न देता सरकारनेच धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन उद्धव ठाकरे धारावी प्रकल्पाला विरोध करत असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. धारावीवरून उद्धव ठाकरे व भाजपमध्ये सामना रंगला आहे.भाजपच्या आरोपावर आज उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.






