
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचे विचार सोडल्याचं जे म्हणत आहेत. त्यांना मी कमळाबाई म्हणतो. कमळाबाई शब्द माझा नाही तर बाळासाहेबांनी दिला आहे. मी घराणेशाहीवाला आहे, बाळासाहेबांचे विचार माझ्याकडे आहेतच. पंतप्रधान घराणेशाहीच्या विरोधात जे टाहो फोडत आहेत त्यांना प्रश्न आहे २०१४ मध्ये मीच पक्षप्रमुख होतो, आत्ताचे जे सांगत आहेत की हे पक्षप्रमुखच नाहीत. मग तुम्ही पाठिंबा कुणाचा घेतला होता? २०१९ मध्ये मला तुम्ही का बोलवलं होतं? अमित शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? त्यावेळी ते मिंध्याकडे का गेले नाहीत?







