
उद्धव ठाकरे म्हणाले, जालन्यात शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर पाशवी लाठीचार्ज झाला. मी सुद्धा गृहमंत्री होतो, त्यावेळीही आंदोलनं झाली, पण कुणावर गोळीबार आणि लाठीचार्ज झाला नाही. मनोज जरांगे यांना भेटलो आणि त्यांनी गोळी दाखवली. पण, जरांगे पाटील यांना सांगतो पहिले यांच्यापासून सावध राहा. हा भगवा इकडे डोलाने फडकतोय, अब्दाली आला होता, त्याने सुद्धा दोहीची बिज लावायची आणि भांडणं लावून द्यायची. तुमच्या पेटत्या घरावर आग लावली जाते त्यावर पोळी शेकली जाते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.






