
हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) :
तरुण पिढीमध्ये बौद्ध धम्माविषयी वैचारिक जाणीव निर्माण करून परिवर्तनवादी चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली १० वी युवा बौद्ध धम्म परिषद – २०२६ रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी नागरत्नजी सभामंडप, यशवंत मंगल कार्यालय, यशवंत नगर (चांदी नगर), हुपरी येथे हजारो बंधू-भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
ही परिषद युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
धम्मदेसना व धम्मचर्चा
सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत पार पडलेल्या धम्मदेसना सत्रात
पूज्य भन्ते सिरी सारो
(महानाग शाक्यमुनी विज्जासन बुद्धिस्ट सेमिनरी, कर्जत, जि. रायगड)
यांनी “बौद्ध धम्म क्रांतीची पाच सूत्रे” या विषयावर सखोल धम्मदेसना दिली.
धम्मचर्चा सत्रात
मा. चिन्मयी सुमित (सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री)
यांनी “परिवर्तनवादी परंपरेचे वारसदार म्हणून आपली जबाबदारी” या विषयावर परखड विचार मांडले.
उद्घाटन
परिषदेचे उद्घाटन
मा. मंगलराव माळगे (नगराध्यक्ष, नगर परिषद हुपरी)
आणि
मा. शिवराज नाईक (चेअरमन, पैसाफंड बँक, हुपरी)
यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रंथप्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम
या वेळी ‘ज्ञानकांड – भाग १’ व ‘वारी समतेची’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले तसेच ठराव फलकांचे अनावरण झाले.
सांस्कृतिक सत्रात ‘निळं वादळ’ शाहीर उदय भोसले व त्यांच्या सहकलाकारांनी प्रबोधनात्मक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
द्वितीय सत्र
दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत
भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६,
धम्मदिक्षा प्रमाणपत्र वितरण व ठराव वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
मान्यवर उपस्थिती
या परिषदेसाठी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली –
मा. मानसिंगराव देसाई (ज्येष्ठ नेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
मा. वैभवदादा कांबळे (आंबेडकरी नेते, कोल्हापूर जिल्हा)
मा. सुधाकर कांबळे (सचिव, हुपरी बौद्ध विहार प्रतिष्ठान)
मा. नम्रता कांबळे (नगरसेविका, हुपरी)
मा. नानासाहेब कांबळे (धम्मसेवक)
मा. निवास धनवडे (विद्यमान नगरसेवक, पेठ वडगाव)
मा. शिवाजी हुपरीकर (सामाजिक कार्यकर्ते, हुपरी)
मा. मिलिंद सनदी (विद्यमान नगरसेवक, पेठ वडगाव)
मा. प्रा. आदिनाथ कांबळे (उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी)
मा. मंदिप कांबळे (सामाजिक कार्यकर्ते, हुपरी)
प्रमुख उपस्थिती
मा. सुनील कल्याणी, मा. अरविंद धरणगुत्तीकर, मा. पांडूरंग मानकापुरे,
मा. संदिप पोळ, मा. डॉ. संजय पाईकराव, मा. भिमराव संघमित्रा,
मा. वंदन कांबळे, मा. नेताजी मधाळे, मा. डॉ. स्वनिल हुपरीकर,
मा. डॉ. अनिल माने, मा. प्रमोद हुपरीकर, मा. बाबासाहेब वडगावकर,
मा. शितल कांबळे, मा. आनंदराव राणे, मा. एम. टी. कांबळे,
मा. रामचंद्र चव्हाण, मा. संगिता कांबळे, मा. सुशांत कांबळे,
मा. दिलीप शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजन समिती व नेतृत्व
या परिषदेचे यशस्वी आयोजन
प्रा. डॉ. किरण सदानंद भोसले
(संस्थापक अध्यक्ष, युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य)
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
संयोजन समितीत
खॉ. संतोष भोसले, मा. सतिश भारतवासी, प्रा. रणजितसिंह भोसले, मा. बापूसाहेब राजहंस, मा. अनिता गवळी, मा. मुक्ताताई भास्कर, मा. वंदना कांबळे, मा. अक्षय कांबळे, मा. संतोष उर्फ रेगन कांबळे, मा. विजय कांबळे, मा. अमर कांबळे, डॉ. अतुल कांबळे, मा. मंदार कुरणे, मा. संतोष गडकर, मा. अजित कांबळे, मा. भगवान कांबळे, मा. दत्तात्रय कांबळे, मा. राकेश धनवडे, मा. संदेश पाटील, मा. अश्विनी कांबळे, मा. कृष्णा कांबळे, मा. भरत कांबळे, मा. विजय पाटील, मा. दिक्षम कांबळे, मा. विकास कांबळे, मा. नितिन कानडे, मा. आकाश कांबळे, मा. धनाजी कांबळे, मा. रंगराव कांबळे, मा. पल्लवी कांबळे, मा. प्रबोध कांबळे, मा. वैशाली कांबळे, मा. प्रविणकुमार पालके, मा. ज्योती डोंगरे, मा. सुनिता खिल्लारे, मा. विजयकुमार चोपडे, मा. लक्ष्मी कांबळे, मा. बाळाबाई कांबळे, मा. भाग्यश्री भंडारे, मा. भगवान बुचडे, मा. तुकाराम साकेकर, मा. पवन भोसले, प्रा. डॉ. सुदर्शन माने, मा. सुनिल कांबळे, मा. काकासाहेब कुरळुपे, मा. अमित कांबळे-सर, मा. सुनिल कानडे, मा. सदानंद भोसले, मा. भास्कर कांबळे-सर, मा. श्रीकांत मिठारे-सर, मा. सुधीर भोसले, मा. रंजना पठारे, मा. बाबासाहेब माने-सर, मा. विशाल शिंदे, मा. संजिवन लोंढे, मा. श्रीकांत कांबळे-सर, मा. पी. ए. कांबळे-सर यांचा समावेश होता.
परिषदेचा समारोप “नमो बुद्धाय ! जय भीम ! जय संविधान !” या घोषणांनी करण्यात आला.







