
तर, दुसरीकडे सायली आपली बॅग भरून घरी जाण्याच्या तयारीत आहे. सायली अर्जुनला आपण घरी जात असल्याचे सांगताच तो आता तिला थांबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सायली एकही न ऐकता सरळ निघून जाणार आहे. यावेळी नेमके तिथे हॉटेलचे मालक येणार आहेत. आता त्यांना खरं कळू नये म्हणून अर्जुनला पुन्हा एकदा नाटक करावं लागणार आहे. त्याच्या या नाटकामुळे सायली मात्र थांबण्याचा निर्णय घेणार आहे.








