
सायली आणि अर्जुन आश्रमातून नुकतेच घरी परतले आहे. चैतन्यमुळे अस्वस्थ असलेल्या अर्जुनची समजूत काढण्यात सायली यशस्वी ठरली आहे. ती अर्जुनला शांत करून पुन्हा घरी घेऊन आली आहे. आपण एकदा चैतन्यशी शांतपणे बोलून बघू, असे तिने अर्जुनला म्हटले आहे. सायलीचं म्हणण पटल्याने आता अर्जुन देखील शांत डोक्याने घरी परतला आहे. आता तो सायलीला प्रपोज करण्याची तयारी करणार आहे. तर, दुसरीकडे, अस्मिता पुन्हा पूर्णा आजीचे कान भरण्याचा प्रयत्न करणार आहे. सायली घरात आल्यामुळेच आपल्या घराला नजर लागली आणि तिच्यामुळे घरात कोर्ट कचेरीची प्रकरणं होऊ लागली, अस बोलून अस्मिता पूर्णा आजीचं मन कलुषित करणार आहे.