
अर्जुन आणि सायली लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जाणार असून, त्यांच्या हनिमूनवरून आता सगळेच त्यांची मस्करी करू लागले आहेत. तर, सायली मात्र मनातून पार घाबरून गेली आहे. सायलीला अर्जुनसोबत हनिमूनला जायचं नसल्याकारणाने ती आता आणखी एक शक्कल लढवणार आहे. यावेळी ती सगळ्यांना सोबत चालण्याचा आग्रह करणार आहे. सगळं बुकिंग झालंच आहे, आपण ते रद्द देखील करू शकत नाही, तर सगळेच सोबत फिरायला जाऊया, असा आग्रह सायली सगळ्यांना करणार आहे. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या सगळ्या मनीषांवर पाणी फिरणार आहे.








