
कोर्टाच्या सुनावणीत अर्जुनने महिपतच्या गुन्ह्यांचा पाढा वाचून दाखवला होता. मात्र, सगळं ऐकल्यानंतर देखील महिपत आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हता. तर, कोर्ट केवळ पुराव्यांवर विश्वास ठेवतं कुणाच्याही बातांवर नाही, असा युक्तिवाद रविराजने केल्याने आता अर्जुनला आपला महत्त्वाचा साक्षीदार सादर करावा लागणार आहे. महिपतच्या या गुन्हांना स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या व्यक्तीला आता अर्जुन साक्षीदार म्हणून कोर्टात आणणार आहे. हा साक्षीदार दुसरा तिसरा कुणी नसून, कुसुम ताई आहे. कुसुम ताईंनी महिपतला जनता चाळीतील लोकांना त्रास देताना तर पाहिलंच आहे. मात्र, जेव्हा आश्रमात खून झाला तेव्हा देखील कुसुम ताई तिथे होत्या, हे आता समोर येणार आहे.








