
तर, कुसुम ताई आपल्याला चुकीचं समजत असल्यामुळे अर्जुन देखील त्यांच्यावर वैतागला होता. रागाच्या भरात अर्जुनने देखील त्यांच्याशी थोडासा वाद घातला. लांबून चैतन्य या सगळ्या गोष्टी बघत होता. मात्र, त्याला देखील अर्जुनला समजावता आले नाही. अर्जुनने यावेळी शांत बसावं, असं चैतन्यला वाटत होतं. मात्र, अर्जुनने आपल्या तोंडाचा पट्टा सुरूच ठेवला होता. दोघांमधील हा वाद मनोरंजक होता.








