
जम्मू-काश्मीर राज्यातील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केला आहे. राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात सैन्य दलाच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिले गेले.







