
काय म्हणाले होते राज ठाकरे?
टोल हा राज्यातला मोठा स्कॅम आहे. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. छोट्या वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाके जाळून टाका, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना दिले आहेत. टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्या कंपन्यांना टोलचे कंत्राट मिळते कसे, असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.






