
स्वस्तिका मुखर्जीने ट्विट करून लिहिले की, ‘रॉबी ठाकूरची भूमिका कोणीही करू शकत नाही. त्या व्यक्तीला तरी एकटे सोडा.’ अनेक बंगाली नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर आपली सहमती दर्शवली, तर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘संपूर्ण बंगाल त्यांना चांगल्याप्रकारे ओळखते, बाकी भारताला ते इतकेसे माहित नाही. त्यांची कथा सगळ्यांनाच सांगायला हवी आणि सिनेमा हे एक चांगलं माध्यम आहे. पण यात त्यांच्या आयुष्यातील कोणता टप्पा दाखवला जातोय यावर सगळं अवलंबून आहे. शांतीनिकेतनच्या शेवटच्या दिवसांची गोष्ट असेल तर खूप छान आहे.’







