
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथे जानेवारी महिन्यात वकील दामत्याची अपहरण करून हत्या करण्यात आली. राजाराम जयवंत आढाव (वय, ५२) आणि त्यांची पत्नी मनिषा राजाराम आढाव (वय, ४२) असे हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या खळबळजनक घटनेनंतर वकील सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी केली होती. यानुसार, सुषमा अंधारे यांनी आज अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान सुषमा अंधारे यांना धक्काबुक्की आणि चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न झाला.






