
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘सर्वात प्रतिभावान आणि सर्वात नम्र कला दिग्दर्शकांपैकी एक, सर्वोत्तम कला दिग्दर्शकांपैकी एक गमावला आहे. अशी काय गोष्ट होती, ज्याने त्यांना इतकं खचल्यासारखं झालं. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे? असं म्हणतात की, देवाला नेहमीच चांगली माणसं हवी असतात. कदाचित देवालाच त्यांची गरज होती का? मला माहीत नाही… पण त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना कायम असतील.’






