
पोलिसांनी सांगितले की, कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या नागरिकत्वाचा शोध घेतला जात आहे. गेल्या १० वर्षापासून महिला भारतात रहात आहे. जेथे तिला बांधून ठेवले होते, तेथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून तिने काहीही खाल्ले नाही. ती किती दिवसापासून झाडाला बांधून आहे, हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला संशय आहे की, तामिळनाडूत राहणाऱ्या महिलेच्या पतीनेच तिला येथे बांधले असावे व पसार झाला असावा. पोलिसांची पथके तामिळनाडू, गोवा आणि अन्य ठिकाणी रवाना करण्यात आली आहे, जेणेकरून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल.







