
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमच्यावर वेगळे संस्कार झाले आहेत. काही लोक सातत्याने भारताचे महान सपुत्र वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्ध वापरत आहेत. आम्ही वीर सावरकरांना अपमानित करणारे लोक नाहीत. ते सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण तरीही त्यांना पश्चाताप होत नाही. हे त्यांचे संस्कार आहेत’, असे बोलत मोदींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. पुढे मोदी म्हणाले की, ‘मी येथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात, त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे, अशा आराध्य दैवत्याची पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतापेक्षा काहीच मोठे नाही’, असेही मोदी म्हणाले.