
उद्धव ठाकरेंनी होऊ द्या चर्चा अभियान राबवण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं आहे. चौका चौकात होऊ दे चर्चा अभियान राबवा आणि मागच्या९ वर्षातले केंद्र सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं होतं, याचाच भाग म्हणून ठाकरे गटाकडून ठाण्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिंदे गटावर टीका झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले.






